CBSE; गुण पडताळणीची तारीख वाढली, आता 'या' तारखेपर्यंत विद्यार्थी करू शकतात अर्ज 

जे विद्यार्थी त्यांच्या गुणांवर समाधानी नाहीत ते आता ३१ मे ते ५ जून २०२४ पर्यंत गुण पडताळणी आणि पुनर्तपासणीसाठी अर्ज करू शकतात. पूर्वी ही वेळ मर्यादा २८ मे ते ३ जून होती. पडताळणीसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी ५०० रुपये द्यावे लागतील, तर पुनर्मूल्यांकनासाठी त्यांना प्रत्येक प्रश्नासाठी १०० रुपये द्यावे लागतील.

CBSE; गुण पडताळणीची तारीख वाढली, आता 'या' तारखेपर्यंत विद्यार्थी करू शकतात अर्ज 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 


 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (Central Board of Secondary Education) च्या १०वी आणि १२वीच्या निकालानंतर गुण पडताळणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. (The board has extended the date of the marks verification process) आता  मंडळाने गुण पडताळणी प्रक्रियेची तारीख वाढवली आहे. बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मूल्यांकन केलेल्या उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत मिळवायचे होते, त्यांच्यासाठी २७ मे रोजी रात्री ११:५९ पर्यंत अर्ज करण्याची संधी होती. आता ही मुदत वाढवण्यात आली आहे. 

 जे विद्यार्थी त्यांच्या गुणांवर समाधानी नाहीत ते आता ३१ मे ते ५ जून २०२४ पर्यंत गुण पडताळणी आणि पुनर्तपासणीसाठी अर्ज करू शकतात. पूर्वी ही वेळ मर्यादा २८ मे ते ३ जून होती. पडताळणीसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी ५०० रुपये द्यावे लागतील, तर पुनर्मूल्यांकनासाठी त्यांना प्रत्येक प्रश्नासाठी १०० रुपये द्यावे लागतील.

तर, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही तारीख बदललेली नाही. पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार, दहावीचे विद्यार्थी ३ जून ते ७ जून पर्यंत गुण पडताळणीसाठी अर्ज करू शकतात.