पुढील शैक्षणिक सत्रापासून वर्षातून दोनदा होणार बोर्डाची परीक्षा; शिक्षण मंत्र्यांची घोषणा
शिक्षण मंत्री म्हणाले की "इयत्ता 11, 12 मध्ये सेमिस्टर सिस्टमवर चर्चा सुरू आहे. वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा आणि उच्च माध्यमिक मध्ये सेमिस्टर पद्धतीचा निर्णय हे दोन्ही शिक्षण व्यवस्थेतील प्रमुख सुधारणांचे महत्त्वाचे भाग आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत (National Educational Policies) शालेय शिक्षणाच्या ढाच्यात काही मोठे बदल होणार आहेत. खुद्द केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, "बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय पुढील शैक्षणिक सत्रापासून म्हणजेच 2026-27 पासून लागू केला जाईल. (The decision to conduct board exams twice a year will be implemented from the next academic session i.e. 2026-27) त्यासाठी तयारी सुरू आहे. मुलांवरील परीक्षेचा ताण कमी करण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल उचलले जात आहे."
एवढेच नाही तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारशीच्या आधारे इयत्ता 11वी आणि 12 वीमध्ये सेमिस्टर पद्धत लागू करण्याची तयारी सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले. ईटी राऊंडटेबलमध्ये बोलताना, शिक्षण मंत्री म्हणाले की "इयत्ता 11 वी ,12 वी मध्ये सेमिस्टर सिस्टमवर चर्चा सुरू आहे. वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा आणि उच्च माध्यमिक मध्ये सेमिस्टर पद्धतीचा निर्णय हे दोन्ही शिक्षण व्यवस्थेतील प्रमुख सुधारणांचे महत्त्वाचे भाग आहेत."
यादरम्यान धर्मेंद्र प्रधान यांनी NEET परीक्षेबाबतही चर्चा केली. ते म्हणाले, "2024 मध्ये जे घडले ते पाहता NEET UG 2025 मध्ये बदल केले जात आहेत. NEET 2024 चे स्वरूप नवीन असेल. आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्याने या नवीन स्वरूपाचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल. मात्र हा बदल विद्यार्थ्यांसाठी अडचण ठरणार नाही. या परीक्षांमध्ये यूपीएससीसारखे परीक्षा मॉडेल स्वीकारण्याची गरज आहे. तसेच राज्य सरकार आणि अगदी जिल्हा पातळीवर प्रशासनाच्या मदतीने एक संघ म्हणून काम करावे लागेल.