विकसित भारत २०४७ साठी उच्च विभागाचा पुढाकार; विद्यापीठ व महाविद्यालयात विविध उपक्रम

२०४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षाच्या जवळ येत असताना, हा उपक्रम व्यापक आणि शाश्वत विकास साध्य करण्यासाठी आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय आणि प्रशासनिक क्षेत्रात प्रयत्नांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो. ही संकल्पना भारताला एक आघाडीची जागतिक शक्ती म्हणून जगासमोर आणण्याची क्षमता दर्शवितो.

विकसित भारत २०४७  साठी उच्च विभागाचा पुढाकार; विद्यापीठ व महाविद्यालयात  विविध उपक्रम

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विकसित भारत २०४७ (Developed India 2047) या केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत (Central Government Initiatives) उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत (Department of Higher and Technical Education) राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विविध उपक्रम राबवण्यात येणार (Various activities will be implemented) असल्याची माहिती प्रसिद्धपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. २०४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षाच्या जवळ येत असताना, हा उपक्रम व्यापक आणि शाश्वत विकास साध्य करण्यासाठी आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय आणि प्रशासनिक क्षेत्रात प्रयत्नांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो. ही संकल्पना भारताला एक आघाडीची जागतिक शक्ती म्हणून जगासमोर आणण्याची क्षमता दर्शवित असल्याचे सांगण्यात आले आहे. 

तरुणांमध्ये हा विचार पुढे नेण्यासाठी "बिकसित भारत राजदूत - युवा कनेक्ट" कार्यक्रम भारत सरकार तर्फे आयोजित केला जाणार असून, याचा उद्देश भारताच्या विकासात्मक परिवर्तनात तरुणांचा सहभाग आणि नेतृत्व वाढवणे हा आहे. या अनुषंगाने राज्यामध्ये या संदर्भात विविध उपक्रम / कार्यक्रम आयोजित करून मा. पंतप्रधानांच्या विकसित भारताच्या दृष्टिकोनाला जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवणे हा आहे. या निमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यातर्फे दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या दरम्यान "विकसित भारत संवाद online व्याख्यानमाला" आयोजित करण्यात येणार असून या व्याख्यानमालेत राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञ व्यक्ती विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहे.

राबवण्यात येणारे उपक्रम -

रक्तदान अमृतमहोत्सव अंतर्गत सर्व विद्यापीठ व महाविद्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करणे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छयोत्सव हा उपक्रम राबविणे. सफाई मित्र सुरक्षा शिबिर अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करणे. Clean Green उत्सव अंतर्गत Zero Waste Management & Used Eco-Friendly Utensils Programme विकसित भारत @ २०४७ मध्ये युवकांचा सहभाग याबाबत व्याख्यान आयोजित करणे. NSS स्थापना दिवस २४ सप्टेंबर, २०२५ निमित्त मा. पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती व पुढील वाटचाल या संदर्भात युवकांशी संवाद कार्यक्रम आयोजित करणे. "एक दिन. एक घंटा, एक साथ" राष्ट्र स्वच्छता अभियान आयोजित करणे. 

जागतिक पर्यावरण आरोग्य दिवसानिमित्त जनजागृती करणे. विश्व पर्यटन दिवस निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांबाबत व त्यांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याबाबत व्याख्यान आयोजित करणे. शहीद भगतसिंह यांच्या जयंतीनिमित्त युवकांमध्ये देशभक्ती, साहस व त्यांचे आदर्शाचे स्मरण करण्यासाठी व्याख्यान आयोजित करणे. जागतिक हृदय दिवस निमित्त पोषण आहार / अनेमिया / हृदय रोग / मधुमेह / उच्च रक्तदाब या बद्दल कार्यशाळा / निबंध / पथनाट्य या सारखे उपक्रम आयोजित करणे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम आयोजित करणे यासारखे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशानुसार याच कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना तर्फे संपूर्ण राज्यभरामध्ये "स्वच्छता ही सेवा" अभियान २०२५ हा उपक्रम विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजना एकक यांचामार्फत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत सार्वजनिक स्वच्छता, सफाई मित्र सुरक्षा शिबीर, Clean Green उत्सव, स्वच्छ सुजल गाव, स्वच्छ आरोग्यदायी स्ट्रीट फूड इत्यादी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच दिनांक २५ सप्टेंबर, २०२५ रोजी राष्ट्रीय स्वच्छता अभियान अंतर्गत सर्व नागरिकांना हाताची साखळी करून संपूर्ण देशभरात आणि राज्यातही श्रमदान अंतर्गत "एक दिन, एक घंटा, एक साथ" हे एक तासाचे अभियान राबविले जाणार आहे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या Apprenticeship Embedded Degree Programme (AEDP) च्या मार्गदर्शक तत्वानुसार पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी AEDP संदर्भात सर्व विद्यापीठांमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.