शिक्षकांना गलेलठ्ठ पगार, पण कर्तव्य काहीच नाही; आमदार प्रशांत बंब
देशाची पुढील चांगली पिढी घडवण्याची सर्वात मोठी जबाबदारी शिक्षकांची आहे. त्यामुळेच शिक्षकांना सैनिकानंतर गलेलठ्ठ पगार दिला जातो, पण कर्तव्य काहीच बजावत नाहीत. मी आजही विनंती करतो शिक्षकांनी गावामध्ये जाऊन मुक्कामी राहावे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
गेल्या सात ते आठ वर्षांपासून मी सातत्याने राज्यातील शिक्षणाची अवस्था मांडत आहे. राज्यात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा बोजवारा (The collapse of primary and secondary education) उडाला आहे. मी त्याची कारणे सातत्याने समोर आणली आहेत. देशाची पुढील चांगली पिढी घडवण्याची सर्वात मोठी जबाबदारी शिक्षकांची आहे. त्यामुळेच शिक्षकांना सैनिकानंतर गलेलठ्ठ पगार (Teachers get a hefty salary) दिला जातो, पण ते कर्तव्य काहीच बजावत नाहीत. मी आजही विनंती करतो शिक्षकांनी गावामध्ये जाऊन मुक्कामी राहावे, आणि विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण द्यावे, असे वादग्रस्त वक्तव्य गंगापूरचे आमदार प्रशांत बंब (MLA Prashant Bamb) यांनी केले आहे.त्यामुळे शिक्षण क्षेत्रातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. मात्र, राज्यातल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा वाचताच येत नाही. हे वास्तव समोर आले आहे. मराठवाड्यातील ८ पैकी ६ जिल्ह्यांत जिल्हा परिषदे शाळांच्या २९ टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही, अशी धक्कादायक माहिती विभागीय आयुक्त प्रशासनाने केलेल्या पाहणी अहवालातून समोर आली आहे. त्यानंतर प्रशात बंब यांनी शिक्षकांवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.
शिक्षक स्वतःची मुले खाजगी शाळेत शिकवतात. ज्या शाळांमधील शिक्षकांना 15 हजारसुद्धा पगार नसतो. परंतु, सरकारी शाळेतील शिक्षकांना साठ हजार ते दीड लाखापर्यंत पगार असतो. मी आता दर्जेदार शिक्षणासाठी मोहीम हातात घेत आहे. राज्यातील शाळांमधील शिक्षक मुख्यालयी थांबत नाहीत, असा आरोप करत शिक्षकांविरोधात रान पेटवणाऱ्या गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी पुन्हा शिक्षकांना चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या आहेत. मी शिक्षकांना हात जोडून विनंती करतो की या सर्व गोष्टी गंभीरतेने घ्या, असे आवाहन आमदार प्रशांत बंब यांनी केले आहे.
शिक्षकांना गावी मुक्कामी राहण्याबाबत प्रशांत बंब म्हणाले, 10 ते 4 या वेळेत शाळा शिकवण्याचे काम शिक्षकांचे नाही. त्यांनी 24 तास गावांमध्ये संस्कार आणि व्यसनमुक्ती करण्याचे काम करावे. पण दुर्देवाने हे सांगावे लागत आहे, शिक्षक त्यांची कर्तव्य बजावत नाहीत. उलट खोटी कागदपत्रे देऊन शासनाकडून विनाकारण पैशाची लूट करतात. ही बाब शिक्षक आणि आम्हा राजकर्त्यांसाठी लज्जास्पद आहे.
मी आता दर्जेदार शिक्षणासाठी मोहीम हातात घेत आहे. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळायला पाहिजे. हे माझे मत आहे. त्यासाठी मी कायदेशीरपणे घटनेच्या चौकटीत प्रयत्न करणार आहे. वेळ प्रसंगी शिक्षकावर कठोर कारवाई करायला शासनाला भाग पडणार आहे. मी शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेणार आहे. दर्जेदार शिक्षणासाठी पाऊले उचलतील त्यासाठी जाऊन मी त्यांची भेटणार आहे, असे आमदार बंब यांनी म्हटले आहे.