जेईई परीक्षेत अव्वल विद्यार्थ्यांची आयआयटी अभ्यासक्रमाकडे पाठ

पहिल्या १०० मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईला सर्वाधिक पसंती दर्शवली. यामध्ये आयआयटी मुंबईमध्ये १०० पैकी ७३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर, आयआयटी दिल्लीमध्ये १९ अणि आयआयटी मद्रासमध्ये सहा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्याचप्रमाणे पहिल्या १००० पैकी आयआयटी मुंबईमध्ये २५२ तर, आयआयटी दिल्लीमध्ये १९६ जणांनी प्रवेश घेतले असल्याची माहिती जेईई अहवालात देण्यात आली आहे.

जेईई परीक्षेत अव्वल विद्यार्थ्यांची आयआयटी अभ्यासक्रमाकडे पाठ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

उत्तम कंपनीत नोकरीची संधी, चांगल्या वेतनाची हमखास खात्री यामुळे बहुतेक विद्यार्थ्यांचे आयआयटीमधून शिक्षण घेण्याचे स्वप्न असते. मात्र जेईई अॅडव्हान्सच्या संयुक्त (Joint JEE Advancedअंमलबजावणी समितीने (जेआयसी) नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात जेईई परीक्षेत अव्वल आलेल्या ३३९ विद्यार्थ्यांनी आयआयटीतील प्रवेशाकडे (IIT Courses Admission) पाठ फिरवली आहे. तर, जेईई परीक्षेत (JEE Exam) पहिल्या १०० विद्यार्थ्यांनी २३ पैकी २० आयआयटीमध्ये प्रवेशास नापसंती दर्शवली आहे. त्यामुळे एकंदरीत आयआयटी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे.

'प्राध्यापक भरती'साठी उद्यापासून राज्यातील प्राध्यापकांचे उच्च शिक्षण संचलनालयासमोर आंदोलन

जेईईच्या अहवालानुसार, पहिल्या ५ हजार क्रमवारीत आलेल्या ३३९ विद्यार्थ्यांनी देशातील आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यास नापसंती दर्शवली आहे. या विद्यार्थ्यांनी आयआयटीऐवजी परदेशी विद्यापीठे, संशोधन संस्थांमधील प्रवेशाला प्राधान्य दिले असून काही विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसह परदेशात प्रवेश मिळवला आहे. आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यास नकार देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या १०० क्रमवारीतील दोन विद्यार्थी, पहिल्या २०० क्रमवारीतील चार विद्यार्थी, पहिल्या ५०० मधील १६, पहिल्या १ हजार मधील ४२ आणि पहिल्या २ हजार मधील ७९ विद्यार्थांचा समावेश आहे.

पहिल्या १०० मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईला सर्वाधिक पसंती दर्शवली. यामध्ये आयआयटी मुंबईमध्ये १०० पैकी ७३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर, आयआयटी दिल्लीमध्ये १९ अणि आयआयटी मद्रासमध्ये सहा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्याचप्रमाणे पहिल्या १००० पैकी आयआयटी मुंबईमध्ये २५२ तर, आयआयटी दिल्लीमध्ये १९६ जणांनी प्रवेश घेतले असल्याची माहिती जेईई अहवालात देण्यात आली आहे.

जुन्या आणि नामांकित आयआयटींच्या तुलनेत नवीन आयआयटी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटची अडचण येते. नवीन आयआयटीमध्ये प्लेसमेंटसाठी कमी कंपन्या येतात आणि तुलनेने वेतनही कमी असते. मोठ्या आयआयटीमधील विद्यार्थ्यांना चांगले आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्रस्ताव मिळतात. संशोधन आणि स्टार्टअपमध्येही चांगल्या संधी मिळतात. लहान आयआयटीमधील विद्यार्थ्यांना स्टार्टअप्ससाठी निधी मिळवण्यातही अडचणी येतात, त्यामुळे विद्यार्थ्यांकडून नवीन आयआयटीला कमी पसंती मिळत असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.