मोठी बातमी: प्राध्यापक भरतीच्या नियमावलीत पुन्हा सुधारणा; 60+20+20 नुसार भरती

शैक्षणिक पात्रता अध्यापन कौशल्य आणि मुलाखत यासाठी वेगवेगळे गुण दिले आहेत. त्यामुळे 60+20+20 असे गुण गृहीत धरून पुढील काळात प्राध्यापक भरती केली जाणार आहे. 

मोठी बातमी: प्राध्यापक भरतीच्या नियमावलीत पुन्हा सुधारणा; 60+20+20 नुसार भरती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील नियमित प्राध्यापकांच्या भरती (professor Recruitment)संदर्भातील सुधारित अध्यादेश अखेर प्रसिद्ध झाला असून त्यात शैक्षणिक व संशोधन पात्रता, अध्यापन कौशल्य मूल्यमापन आणि मुलाखतीमधील कामगिरी यासाठी अनुक्रमे 60, 20, 20 असे गुण दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे पीएचडी, एम फिल साठी 17 गुण आहेत. नेट जीआरएफ, फक्त नेट व सेट Net and Set परीक्षेसाठी वेगवेगळे गुण आहेत. तसेच तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचा (CHB Professor) अनुभव ग्राह्य धरला जाणार आहे, राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने प्राध्यापक भरती संदर्भातील सुधारित अध्यादेश प्रसिद्ध केला असला तरी त्यावर आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे. 

राज्य शासनाने प्राध्यापक भरती संदर्भातील पारदर्शकतेसाठी राज्यपाल कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार अध्यादेश प्रसिद्ध केला होता. परंतु, त्यावर शिक्षण क्षेत्रातून टीका करण्यात आली होती. त्यामुळे राज्य शासनाने पुन्हा एकदा सुधारित अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. या अध्यादेशात शैक्षणिक पात्रता अध्यापन कौशल्य आणि मुलाखत यासाठी वेगवेगळे गुण दिले आहेत. त्यामुळे 60+20+20 असे गुण गृहीत धरून पुढील काळात प्राध्यापक भरती केली जाणार आहे. 

नागपूर हादरले! १५ वर्षीय विद्यार्थीनीवर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिघांकडून अत्याचार

पदवी व पदव्युत्तर पदवीसाठी गुणदान असून संबंधित विद्यार्थ्याला किती टक्के गुण मिळाले आहेत हा विचार करून संबंधित विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यांकन केले जाणार आहे. त्यामुळे निश्चितच पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. 

वादाचा मुद्दा कायम 

एनआयआरएफ रँकिंग मध्ये ज्या विद्यापीठाने चांगली कामगिरी केलेली आहे, अशा विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना वेगवेगळे गुणदान होणार असल्याचे अध्यादेशामधून स्पष्ट होत आहे. त्याचप्रमाणे qs रँकिंगसह इतर परदेशी विद्यापीठांच्या क्रमवारीत संबंधित विद्यापीठ कोणत्या क्रमांकावर आहे, याचा विचार करून सुद्धा संबंधित विद्यार्थ्याला गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे ज्या गोष्टीवर उमेदवारांनी आक्षेप घेतला होता; ती बाब अजूनही कायम आहे. विद्यार्थ्यांनी यापूर्वी कोणत्या विद्यापीठांमधून पदवी घेतली आणि ते विद्यापीठ आता एनआयआरएफ रँकिंग मध्ये कोणत्या क्रमांकावर आहे, याचा विचार करून उमेदवाराला प्राध्यापक भरतीसाठी गुणदान दिले जाणार आहेत. हे बाब तार्किक नसल्याने या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे.