विद्यापीठातील वादग्रस्त नाटक प्रकरणात जितेंद्र आव्हाडांचे ट्विट
गाढवाचं लग्न, वस्त्रहरण, यदाकदाचित, जाने भी दो यारो, जावईबापूच्या गोष्टी, मराठी वाड्.मयाचा गाळीव इतिहास अशा साहित्य, नाटक, सिनेमातून व्यंगात्मक पद्धतीने गोष्टी दाखवल्या गेल्या तेव्हा कधी असा हिंसक प्रकार घडला नव्हता.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune Univercity) ललित कला केंद्रात २ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या 'जब वी मेट' (Jab wi met) या नावाच्या नाटकामुळे आता रामायण रंगायला सुरुवात झाली आहे.कालचा हल्ला ही महाराष्ट्रासाठी शरमेची गोष्ट असल्याची तिव्र प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी दिली आहे. त्यासंदर्भात त्यांनी आपल्या ट्विटर या सोशल मीडियावर (Social Media) भली मोठी पोस्ट शेअर केली आहे.
जब वी मेट नावाच्या या नाटकात रामायणात काम करणाऱ्या कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, नाटकातील संवाद आणि कृत्यावर आक्षेप नोंदवत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हा कार्यक्रम हाणून पाडला. मात्र या नाटकातील संवादांवर एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि नाटकाचा प्रयोग उधळून लावला. यावेळी नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण देखील करण्यात आली. या नाटकात राम आणि सीता यांच्यासंदर्भात काही आक्षेपार्ह दृष्य दाखवण्यात आली होती,असा आरोप या संघटनेकडून करण्यात आला. त्यामुळे हा सगळा राडा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कालचा हल्ला ही महाराष्ट्रासाठी शरमेची गोष्ट: जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सावित्रीबाई फुले विद्यापीठातील ललित कला केंद्रात एका लोककलेशी संबधित नाटकाच्या प्रयोगात विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना अभाविपकडून झालेली मारहाण घृणास्पद आहे. ज्यांनी मारहाण केली त्या गुंडांवर कोणतीही कारवाई न करता मुले आणि प्राध्यापक यांच्यावर मात्र विविध जाचक कलमे लावून पोलीस कारवाई सुरू आहे. गाढवाचं लग्न, वस्त्रहरण, यदाकदाचित, जाने भी दो यारो, जावईबापूच्या गोष्टी, मराठी वाड्.मयाचा गाळीव इतिहास अशा साहित्य, नाटक, सिनेमातून व्यंगात्मक पद्धतीने गोष्टी दाखवल्या गेल्या तेव्हा कधी असा हिंसक प्रकार घडला नव्हता. आजच्या काळात विजय तेंडुलकर, पू.ल.देशपांडे हे जिवंतच राहिले नसते. गाडगेबाबा, प्रबोधनकार ठाकरे हे गोळ्यांना बळी पडले असते.