RTE प्रवेशाची प्रतीक्षा संपली ; प्रवेशासाठी 93 हजार 9 विद्यार्थ्यांची निवड; सोमवारी SMS मिळणार

आरटीई २५ टक्के प्रवेश मिळाल्याचा SMS प्राप्त झालेल्या पालंकानी येत्या २३  ते दिनांक ३१ जुलैपर्यंत आपल्या जिल्हयातील संबंधीत तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करावी.

RTE प्रवेशाची प्रतीक्षा संपली ; प्रवेशासाठी 93 हजार 9 विद्यार्थ्यांची  निवड; सोमवारी  SMS मिळणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

RTE Admission: आरटीई प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांसाठी मोठी बातमी आहे.शालेय शिक्षण विभागाने (school education department)आरटीई प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक (RTE admission process schedule)प्रसिद्ध केले आहे.त्यानुसार प्रवेशासाठी निवड(selection for admission)झालेल्या बालकांच्या पालकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर येत्या सोमवारपासून (दि. २२) SMS जाण्यास सरूवात होईल. आरटीई २५ टक्के प्रवेश मिळाल्याचा SMS प्राप्त झालेल्या पालंकानी येत्या २३  ते दिनांक ३१ जुलैपर्यंत आपल्या जिल्हयातील संबंधीत तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी (scrutiny of documents)करावी.पडताळणी समितीमार्फत आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे,असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्णयानुसार प्रवेश पात्र विदयार्थ्यांची निवड यादी व प्रतिक्षा यादी  20 जुलै रोजी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष  २०२४-२५ मधील आरटीई २५ टक्के प्रवेश प्रकीया अंतर्गत सोडत  ०७.०६.२०२४ रोजी शिक्षण आयुक्त यांचे उपस्थितीत काढण्यात आलेली होती, मात्र, उच्च न्यायालयात  हस्तक्षेप याचिका दाखल झाल्याने प्रवेश पात्र विदयार्थ्यांची निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आलेली नव्हती.न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर आता यादी प्रसिध्द केली जात आहे. आरटीई प्रवेशासाठी 2 लाख 42 हजार 516 विद्यार्थ्यांनी आरटीई प्रवेशासाठी अर्ज केला.मात्र प्रवेशासाठी 1 लाख 5 हजार 223 जागा उपलब्ध आहेत. त्यातील 93 हजार 9 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली असून 71 हजार 276 विद्यार्थ्यांचा समावेश प्रतीक्षा यादीत करण्यात आला आहे. 

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत ऑनलाईन सोडतीद्वारे निवड झालेल्या निवड यादीतील बालकांच्या पालकांना प्रवेशासाठी जिल्हयातील सर्व तालुकास्तरावरील पडताळणी केंद्राची संबंधित अधिकारी यांनी तपासणी करून पडताळणी केंद्रे अद्ययावत करण्यात यावीत. तसेच पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या बालकांचा अर्ज कमांक टाकून अर्जाची स्थिती पडताळावी. तसेच  वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालकांनी अवलोकन करावे, असे आवाहन राज्याचे प्राथमिक्स शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी केले आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागाची अधिसूचना दिनांक ०९.०२.२०२४ तसेच त्यानुषंगाने शिक्षण संचालक (प्राथमिक), पुणे यांची दिनांक ०६.०३.२०२४ व ०३.०४.२०२४ रोजीचे परिपत्रके रद्द केलेली आहे. जनहित याचिकांमध्ये काही संस्थांनी हस्तक्षेप याचिका दाखल केलेल्या होत्या. या हस्तक्षेप याचिकांद्वारे त्या संस्थांनी शासन अधिसूचना दिनांक ०९.०२.२०२४ नुसार २५ टक्के राखीव जागांवर काही बालकांना प्रवेश दिल्याने त्यांनी उन्न न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेले होते. 

उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ज्या शाळांनी या राखीव जागांवर ज्या बालकांना प्रवेशित केलेले होते. त्या बालकांचा प्रवेश अबाधित ठेवला आहे. परंतु, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये कोणत्याही परिस्थितीत वंचित व दुर्बल घटकातील विदयार्थ्यांना २५ टक्के प्रवेश देणे बंधनकारक असल्याने ज्या शाळांनी २५ टक्के राखीव जागांवर असे प्रवेश दिलेले आहेत. त्यांनी सुध्दा आरटीई २५ टक्के अंतर्गत पहिली/ नर्सरी या वर्गात वंचित व दूर्बल घटकातील विदयार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत न्यायालयाने आदेश दिले आहे. यामुळे जरी या शाळांतील पहिली/नर्सरीच्या वर्गातील प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश होणार असेल तरी याची माहिती संबंधीत संस्था/शाळांनी संबंधीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक), संबंधीत जिल्हा परिषद/प्रशासन अधिकारी मनपा/नपा/संबंधीत विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे देण्यात यावी व हे प्रवेश नियमित करून घ्यावेत.