विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा; राष्ट्रीय अन्वेषण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पटकवले ४ पारितोषिक 

विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आपले नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सादर करून हे उज्ज्वल यश संपादन केले आहे.त्यामुळे विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा; राष्ट्रीय अन्वेषण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पटकवले ४ पारितोषिक 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी गुजरात येथे पार पडलेल्या अन्वेषण या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पहिले, दुसरे आण तिसरे पारितोषिक पटकावले आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आपले नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सादर करून हे उज्ज्वल यश संपादन केले आहे.त्यामुळे विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे. 

सिद्धी जोशी आणि तनिषा कसबे या विद्यार्थ्यांनी  आरोग्य विज्ञान या श्रेणीत मधुमेहाच्या जखमांसाठी एक नाविन्यपूर्ण, बहु-कार्यात्मक प्रोबायोटिक आधारित ड्रेसिंग सिस्टम तयार केली आहे. या प्रकल्पाला पहिल्या क्रमांचे पारितोषिक मिळाले आहे. तर विधी बलदोटा आणि अनुराग मेहता यांनी बेसिक सायन्स मधील जैवसंभाव्य सिग्नलद्वारे मानवी दृष्टीचे भाकित विश्लेषण करणारा प्रकल्प सादर केला.त्यास दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.तसेच रुद्र रमेश हट्टे आणि सृजन देशमानकर यांनी सादर केलेल्या व्यवसाय व्यवस्थापन आणि कायदा या प्रकल्पा सुध्दा दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे शिवम रमेश देवकर यांच्या कृषी विज्ञा वर्गातील उच्च कार्यक्षमता बहुउद्देशीय मल्चिंग पेपर लेइंग मशीनला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

विद्यापीठातर्फे आविष्कार स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी संशोधन प्रकल्पाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले जात आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. एवढेच नाही तर विद्यार्थी नावीन्यपूर्ण कल्पना समोर ठेवून विविध प्रकल्प तयार करू लागले आहेत.विद्यापीठाने आविष्कार स्पर्धेच्या अनुषंगाने विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली.या समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले गेले.त्यामुळे अन्वेषण स्पर्धेत विद्यार्थ्यांना चमकदार कामगिरी  करून दाखवता आली. IQAC चे संचालक डॉ. विनायक जोशी यांनीही या स्पर्धेसाठी महत्वाचे योगदान दिले आहे. 

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.तसेच अन्वेषणमधील SPPU चे यश हे अविष्कार उपक्रमातून घडलेल्या संशोधन संस्कृतीचे द्योतक असल्याचे सांगितले असून सर्व विजेते, अविष्कार समिती व IQAC टीमचे त्यांनी अभिनंदन केले आहे.