शिक्षण क्षेत्रात खळबळ, प्रतिष्ठित IIT पवईच्या वसतिगृहात सापडली ५ जिवंत काडतुसे, बिहार कनेक्शन
भारतातील सर्वात प्रतिष्ठित संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी पवई वसतिगृह कॅम्पसमध्ये एका विद्यार्थ्याच्या बॅगेतून पाच जिवंत ७.६५ मिमी काडतुसे सापडली. या घटनेमुळे कॅम्पस सुरक्षा आणि विद्यार्थ्यांच्या हालचालींवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मुंबईतून शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी धक्कादायक घटना (Shocking incident) उघडकीस आली आहे. पवईच्या IITमध्ये (IIT Powai) एका विद्यार्थ्याच्या बॅगेमध्ये काडतुसं (Cartridges in the student's bag) सापडली आहेत. IIT पवईमध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली होती. या घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी दोघांच्या खोल्यांची झडती घेतली. खोलीच्या झडती (Room searches) दरम्यान एका विद्यार्थ्याच्या बॅगेमध्ये काडतुसं सापडलेल्याचे समोर आले आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
भारतातील सर्वात प्रतिष्ठित संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी पवई वसतिगृह कॅम्पसमध्ये एका विद्यार्थ्याच्या बॅगेतून पाच जिवंत ७.६५ मिमी काडतुसे सापडली. या घटनेमुळे कॅम्पस सुरक्षा आणि विद्यार्थ्यांच्या हालचालींवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पवई पोलिसांनी सर्वोत्तम आनंद सतीशचंद्र चौधरी (वय वर्षे २३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आयआयटी बॉम्बेच्या वसतिगृह क्रमांक १ च्या तळमजल्यावर सूरज दुबे आणि अमन या दोन विद्यार्थ्यांमध्ये पैशाच्या व्यवहारावरून जोरदार वाद सुरू होता. माहिती मिळताच, सुरक्षा पथक ९३ आणि ८९ नंबरच्या खोल्यांमध्ये पोहोचले आणि सूरज दुबे आणि त्याचा मित्र अपूर्व मिश्रा यांना दारूचा वास आला. कॅम्पस नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय आल्याने खोल्यांची कसून तपासणी केली असता, सूरज दुबेच्या खोलीत एका पिशवीत पाच जिवंत काडतुसे आढळून आली.
पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर सूरजने सांगितले की, ही बॅग अपूर्व मिश्राची आहे, तर अपूर्वाने सांगितले की ही काडतुसे त्याचा मित्र सर्वोत्तम चौधरीची आहेत. मूळचा बिहारमधील समस्तीपूर येथील रहिवासी असलेला सर्वोत्तमने पोलिसांना कबूल केले की त्याने ही काडतुसे बिहारमधील मुंगेर येथून खरेदी केली होती. मुंगेर हे बेकायदेशीर शस्त्रास्त्र निर्मितीसाठी ओळखले जाते, त्यामुळे पोलिसांना मोठ्या नेटवर्कचा संशय आला आहे. मुंबईमध्ये आयआयटीमधील या काडतुसांचे कनेक्शन बिहारपर्यंत असल्याचे समोर आले आहे.
पवई पोलीस यापूर्वी कोणाला काडतुसे पुरवली आहेत का? आणि त्याचा खरा हेतू काय होता? याचा तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल रेकॉर्डची तपासणी सुरू केली आहे आणि काडतुसेचा मुख्य पुरवठादार शोधण्यासाठी एक विशेष पथक तयार केले आहे. मात्र या घटनेमुळे कॉलेजमधील सुरक्षा आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा याचा मुद्दा समोर आला आहे.