Breaking News:शालार्थ आयडी घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश वाघमारेला अटक

कनिष्ठ प्रशासन अधिकारी रवींद्र पाटील यांनी सायबर पोलिसांना या संदर्भात तक्रार दिली होती. तक्रारीत 233 शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचे बोगस शालार्थ आयडी तयार करून शासनाच्या निधीचे नुकसान केल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश वाघमारे फरार झाले होते.

Breaking News:शालार्थ आयडी घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश वाघमारेला अटक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यातील (Shalarth ID scam)मुख्य आरोपी निलेश वाघमारे (Nilesh Waghmare)यांना अटक करण्यात आली आहे. सुमारे चार महिन्यांपासून ते फरार होते. वाघमारे यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाकडून त्यांचा जामीन अर्ज रद्द करण्यात आला. त्यानंतर गुरुवारी दुपारी सायबर पोलिसांनी त्यांना धरमपेठेतील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. 

निलेश वाघमारे हे भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक (Nilesh Waghmare is the Superintendent of the Provident Fund Team)म्हणून कार्यरत होते. नागपूर विभागात 2019 ते 2025 यादरम्यान अनेक शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बोगस शालार्थ आयडी तयार करून त्याद्वारे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करण्यात आल्याची बाब उघड झाली होती. विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीने ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर कनिष्ठ प्रशासन अधिकारी रवींद्र पाटील यांनी सायबर पोलिसांना या संदर्भात तक्रार दिली होती. तक्रारीत 233 शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचे बोगस शालार्थ आयडी तयार करून शासनाच्या निधीचे नुकसान केल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश वाघमारे फरार झाले होते. तक्रारीच्या नंतर काही दिवसातच उपसंचालक उल्हास नरड आणि शिक्षक पराग बुगडे यांनाही अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांनी निलेश वाघमारे यांना निलंबित करण्यात आले होते. 

दरम्यान, शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणाची चौकशी केवळ नागपूर विभागापुरती मर्यादित न ठेवता राज्यातील सर्व विभागाची याप्रकरणी चौकशी करावी,अशी मागणी पावसाळी अधिवेशनात करण्यात आली. त्यास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उत्तर देताना एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली. पुणे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन झाली आहे. त्यातच अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघातर्फे चौकशी झाल्याशिवाय शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक करू नये,या मागणीसाठी काम बंद आंदोलन करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हे काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले. त्यातच आता निलेश वाघमारे यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणातील आरोपींची सुटका नाही, हे स्पष्ट झाले आहे.