'अखिल भारतीय शिक्षा समागम'मध्ये महाराष्ट्राच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक

कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध राज्यातील शिक्षण मंत्री, प्रधान सचिव, शिक्षणतज्ज्ञ आणि इनोव्हेटर्स यांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंग देओल हे यावेळी उपस्थित होते.

'अखिल भारतीय शिक्षा समागम'मध्ये महाराष्ट्राच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

भारतीय शिक्षण क्षेत्राच्या इतिहासात मोलाचा बदल ठरलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाला (New Education Policy) पाच वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्ताने ‘अखिल भारतीय शिक्षा समागम – 2025’ (All India Shiksha Samagam – 2025) या कार्यक्रमाचे आयोजन भारत मंडपम, येथे करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय शिक्षण मंत्रालयाने (Ministry of National Education) महाराष्ट्र सरकारच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक केले आणि अन्य राज्यांनी देखील या मॉडेलचा अभ्यास करावा असे आवाहन केले. त्यामुळे ही बाब महाराष्ट्रासाठी कौतुकास्पद आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध राज्यातील शिक्षण मंत्री, प्रधान सचिव, शिक्षणतज्ज्ञ आणि इनोव्हेटर्स यांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंग देओल हे यावेळी उपस्थित होते.

यावेळी राज्यातील राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 च्या अंमलबजावणीसाठी राबवलेली धोरणात्मक पावले, शिक्षक प्रशिक्षण, मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (FLN), शालेय मूल्यांकन प्रणाली व भाषिक समावेश यांसारख्या महत्त्वाच्या कामांची माहिती देण्यात आली. शिक्षण मंत्री यांच्यासोबत सुकाणू समितीचे सदस्य आणि शिक्षण अभ्यासक सचिन जोशी होते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत शिक्षण हे केवळ ज्ञानप्राप्ती नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी माध्यम असल्याचे मत मंत्री भुसे त्यांनी 'माध्यमिक शिक्षणात सक्रिय सुधारणा' या चर्चासत्रात बोलताना व्यक्त केले. महाराष्ट्राने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीत देशात आदर्शवत कार्य केले असून, अशा शैक्षणिक संमेलनातून शालेय शिक्षणात गुणवत्तात्मक परिवर्तनाची नवी दिशा निर्माण होत आहे. आजच्या सत्रांमध्ये राज्याच्यावतीने महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षण व अध्यापनातील बदल यावर शिक्षण तज्ञ सचिन जोशी यांनी मार्गदर्शन चर्चेत सहभाग घेतला.