महाराष्ट्र करणार देशातील 'एआय आणि तंत्रज्ञान क्रांती'चे नेतृत्व
महाराष्ट्र राज्य लवकरच भारताच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI technology) माध्यमातून राज्य शासनामार्फत प्रशासन व अर्थव्यवस्थेला गती (Accelerate administration and economy) देण्यात येत असून महाराष्ट्र राज्य लवकरच भारताच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे (AI and the technology revolution) नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला. मुंबई येथे नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप समिट (NASSCOM Technology and Leadership Summit) या कार्यक्रमात त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे.
फडणवीस म्हणाले, राज्यात डिजिटल सेवांचे प्रमाण वाढले असून, बहुतांश शासकीय सेवा ऑनलाइन उपलब्ध झाल्या आहेत. राज्य शासनाने मुंबई विद्यापीठात एआय सेंटरची स्थापना केली आहे. जागतिक आर्थिक मंचासोबत भागीदारीतून इंडस्ट्री सेंटर स्थापन करण्यात आले आहे.
शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘अॅग्री-स्टॅट’ उपक्रमाअंतर्गत संपूर्ण शेती प्रक्रियेचे डिजिटलायझेशन करण्यात येत आहे. ‘ड्रोन शक्ती’ कार्यक्रमांतर्गत ड्रोन प्रशिक्षण देऊन कृषी फवारणी खर्च कमी करण्याचा मानस असल्याचे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.