महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती २०२३ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
मराठी समाजाला २०२४ मध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाचे (SEBC) सुधारित आरक्षण निकष लागू करण्यात आले. यामुळे लघुलेखक (निम्न श्रेणी), लघु टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल आणि लेखा अधिकारी यांसारख्या काही संवर्गाच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलण्याची गरज होती. आता या पदांच्या परीक्षा उर्वरित २३ संवर्गासोबत १० जुलै, ६ ऑगस्ट आणि ८ ते १० ऑगस्ट या दरम्यान होणार आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती परीक्षेत (Maharashtra Industrial Development Corporation Recruitment Exam) सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महामंडळाने सरळसेवा भरती २०२३ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर (Exam schedule announced) केले आहे. जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, गट अ, ब आणि क पदांसाठीच्या परीक्षेची माहिती देण्यात आली आहे. सुधारित आरक्षण निकषांमुळे काही परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे, तर उर्वरित पदांसाठी परीक्षा जुलै आणि ऑगस्ट २०२५ मध्ये होणार आहेत. या सर्व परीक्षा १० जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत (Exams from July 10 to August 10) पार पडणार आहेत.
वडिलांची निर्घृण हत्या, पण जिद्द सोडली नाही, संतोष देशमुखांच्या लेकीला NEET परीक्षेत घवघवीत यश..
मराठी समाजाला २०२४ मध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाचे (SEBC) सुधारित आरक्षण निकष लागू करण्यात आले. यामुळे लघुलेखक (निम्न श्रेणी), लघु टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल आणि लेखा अधिकारी यांसारख्या काही संवर्गाच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलण्याची गरज होती. आता या पदांच्या परीक्षा उर्वरित २३ संवर्गासोबत १० जुलै, ६ ऑगस्ट आणि ८ ते १० ऑगस्ट या दरम्यान होणार आहेत.

परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र महामंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंकद्वारे परीक्षेपुर्वी किमान ७ दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संबंधित उमेदवारांना सदर संकेतस्थळावरून त्यांचे परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावे लागणार आहेत. उमेदवारांना त्यांनी निवडलेले परीक्षा केंद्रच मिळेल याची खात्री देता येणार नसल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवेशपत्रामध्ये व माहितीपुस्तकात नमूद केलेल्या सूचनांचे काळजीपुर्वक वाचन करून त्याचे तंतोतंत पालन करावे व परीक्षा केंद्रावर वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन देखील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.