दहा वर्षापासून पगार न मिळाल्याच्या नैराश्येतून, प्राध्यापकाने विष घेऊन मृत्यूला कवटाळले 

कुटुंबाचा उदरनिर्वाय, मुलाचे शिक्षण, मुलीचे लग्न यांसारख्या समस्या भेडसावत होत्या. या सर्व चिंतेमुळे प्राध्यापकाने सोमवारी आपल्या शेतात विष प्राशन करुन मृत्यूला कवटाळले.

दहा वर्षापासून पगार न मिळाल्याच्या नैराश्येतून, प्राध्यापकाने विष घेऊन मृत्यूला कवटाळले 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

गेल्या दहा वर्षापासून पगार न मिळल्याच्या (No salary for ten years) नैराश्यातून एका प्राध्यापकाने विष प्राशन करुन आपली जीवन यात्रा संपवली. (Suicide by drinking poison) ही धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे घडली. मागील अनेक वर्षापासून महाविद्यालय प्रशासनाकडून पगार (There is no salary from the college administration) मिळत नसल्याने शेतीकडे लक्ष वळवले. मात्र तेथे देखील निराशा पदरी पडली. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाय, मुलाचे शिक्षण, मुलीचे लग्न यांसारख्या समस्या भेडसावत होत्या. या सर्व चिंतेमुळे प्राध्यापकाने (Prof. Anil Bhavanrao Chavan) सोमवारी आपल्या शेतात विष प्राशन करुन मृत्यूला कवटाळले.

प्रा. डॉ. अनिल भावनराव चव्हाण वय ५६ वर्ष रा. जयनगर, पुसद असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या विनानुदानित शारीरिक शिक्षण (बीपीएड) महाविद्यालयात प्रा. अनिल चव्हाण काम करतात. मात्र, २०१३-१४ पासून विद्यार्थ्यांची संख्या घटत गेली. त्यामुळे या महाविद्यालयासह जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालये नावालाच उरली . 

गेल्या दहा वर्षापासून महाविद्यालयात काम करत असताना पगार मिळत नव्हता. महाविद्यालयातून मोकळा वेळ मिळेल अशा वेळी शेतीकडे लक्ष घातले.  मात्र, यवतमाळ सारख्या दुष्काळी भाागात सततच्या नापिकीमुळे तेथेही निराशा पदरी पडली. सततच्या नापिकीमुळे आर्थिक चणचण भासत होती. अशा स्थितीत पदवीचे शिक्षण घेत असलेल्या आपल्या मुलीचे लग्न व एकुलत्या एक मुलाचे शिक्षण कसे करायचे? याची चिंता त्यांना सतावत होती. यातूनच त्यांनी विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

विष घेतल्यानंतर त्यांनी ही माहिती स्वतःच मोबाइलवरून कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर सर्व कुटुंबीय शेताकडे धावात गेले. प्रा. चव्हाण यांना तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालायात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. अखेर डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.