नाशिकमध्ये ५वी, ७वीच्या विद्यार्थ्यांचा फिल्मी स्टाईल राडा; हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

नाशिक जिल्ह्यातील एका शाळेबाहेर विद्यार्थ्यांच्या फिल्मी स्टाईल राड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होता आहे. एरवी गावगुंड, मोकाट तरुण यांच्या हाणामारी किंवा राड्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, आता हे लोन ५वी ७वीच्या शालेय विद्यार्थ्यांपर्यंत येऊन पोहोचले आहे.

नाशिकमध्ये ५वी, ७वीच्या विद्यार्थ्यांचा फिल्मी स्टाईल राडा; हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नाशिक जिल्ह्यातील एका शाळेबाहेर विद्यार्थ्यांच्या फिल्मी स्टाईल राड्याचा (A Filmy-Style Brawl) व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल (Vide viral on social media) होत आहे. एरवी गावगुंड, मोकाट तरुण यांच्या हाणामारी किंवा राड्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, आता हे लोन ५वी ७वीच्या शालेय विद्यार्थ्यांपर्यंत (School students in the 5th and 7th Class) येऊन पोहोचले आहे. मोठ्या लोकांचे, चित्रपटाचे घटनेचे किंवा मोबाईल मधील व्हायरल कृतीचे विद्यार्थी आता प्रत्यक्ष अनुकरण करताना दिसत आहेत. त्यामुळे ही शिक्षण क्षेत्रासाठी धोक्याची घंटा (A matter of concern for the education sector) असून शिक्षणतज्ज्ञांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहराजवळ वडाळा गावातील महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधील किरकोळ वादाने गंभीर वळण घेत थेट हाणामारीत रूपांतर झाल्याची घटना समोर आली. इयत्ता पाचवी ते सातवीत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांमध्ये वर्गात एका बेंचवर बसण्यावरून वाद झाला. हा वाद शाळेबाहेर येऊन अवघ्या ५० मीटर अंतरावरील माळी गल्लीत पोहोचला आणि विद्यार्थी एकमेकांवर तुटून पडले. 

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत विद्यार्थ्यांना सोडवले. मात्र, एवढ्या लहान वयातील मुलांनी शाळेतील किरकोळ वादामुळे एवढा मोठा राडा केल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधीही शाळेतील छोट्या वादांचे रूपांतर टोकाच्या वादात होत असल्याचे प्रकार घडले असून काही वेळा हे प्रकरण पालकांमार्फत पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचत असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेली आक्रमकता आणि वैमनस्य ही चिंतेची बाब ठरत आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर संबंधित महापालिका शाळा व शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे, शाळांमध्ये शिस्त आणि संवाद वाढवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांकडून होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये समजूतदारपणा आणि शांततेची भावना रुजवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.