कृषीच्या 'या' विद्यार्थ्यांना डायरेक्ट पदवीच्या दुसर्या वर्षात प्रवेश, ३० एप्रिलपासून प्रवेश प्रक्रिया सुरू
महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांतर्गत तीन वर्षाचा इंग्रजी माध्यमातील कृषी पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट पदवीच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश देण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेला ३० एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांतर्गत (Agricultural University) तीन वर्षाचा इंग्रजी माध्यमातील कृषी पदविका अभ्यासक्रम (Agricultural Technical Institute Diploma Course) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट पदवीच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश (Direct admission to the second year of graduation) देण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेला ३० एप्रिलपासून सुरुवात (Admission process starts from April 30th) होणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून राबविण्यात येते.
मागील वर्षापासून प्रथमच पदवी अभ्यासक्रमासाठी थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश देण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे यंदा या प्रवेश प्रक्रियेची अनेक विद्यार्थी अतुरतेने वाट पाहात आहेत. राज्यातील कृषी महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेण्यासाची प्रवेश प्रक्रिया ३० एप्रिलपासून सुरू करण्याचे नियोजन सीईटी कक्षाने केले आहे. दहावीनंतर कृषी महाविद्यालयांमध्ये तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकूण जागांपैकी १० टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. या जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे.
मागील वर्षी राज्यभरात पदवी अभ्यासक्रमासाठी सुमारे १८ हजार जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी १ हजार ८०० जागा थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. यंदा देखील तेवढ्याच जागा राखीव ठेवल्या जाण्याची शक्यता आहे. ही प्रवेश प्रक्रिया कृषी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे. पदविका पूर्ण केल्यानंतर थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतल्याने विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाचेल आणि त्यांना अधिक संधी उपलब्ध होतील, हा उद्देश ठेवून डायरेक्ट दुसऱ्या वर्षात प्रवेश दिला जात आहे.