अमरावती विद्यापीठात 'कॅरिऑन पद्धत' लागू, विद्यार्थ्यांना थेट अंतिम वर्षात प्रवेश
विद्यापीठ नियमावलीनुसार अगोदर प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना संपूर्ण विषय उत्तीर्ण झाल्यानंतर अंतिम वर्षात प्रवेश दिला जायचा. तसेच दुसऱ्या वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना २ किंवा ३ विषय उत्तीर्ण करणे आवश्यक होते. मात्र, अमरावती विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू केली असून यात सरसकट प्रवेश द्यावे लागणार आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने (Sant Gadge Baba Amravati University) विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. या शैक्षणिक वर्षात सर्व विद्या शाखांच्या विद्यार्थ्यांना पहिल्या व दुसऱ्या वर्षातील विषयांचे बॅकलॉग असले तरी आता 'कॅरिऑन' लागू ('Carrion' method applied) झाल्याने थेट अंतिम वर्षांत प्रवेश घेता येणार आहे. क्रेडिट बेस सिस्टम (सीजीएस) व चाईस बेस क्रेडिट सिस्टम (सीबीसीएस) अशा जुन्या, नव्या पॅटर्नच्या प्रवेशित विद्यार्थ्यांना ही नियमावली लागू होणार (Regulations will be implemented) आहे.
विद्यापीठ नियमावलीनुसार अगोदर प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना संपूर्ण विषय उत्तीर्ण झाल्यानंतर अंतिम वर्षात प्रवेश दिला जायचा. तसेच दुसऱ्या वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना २ किंवा ३ विषय उत्तीर्ण करणे आवश्यक होते. मात्र, अमरावती विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू केली असून यात सरसकट प्रवेश द्यावे लागणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थी हित लक्षात घेता 'कॅरिऑन' पद्धत लागू केली आहे. या नव्या निर्णयामुळे विद्यार्थांना प्रथम आणि द्वितीय वर्षातील विषय एटीकेटी असले तरी अंतिम वर्षात प्रवेश घेता येणार आहे.
प्रत्येक शाळेत मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी करा; शिक्षणमंत्र्यांचे निर्देश
त्यामुळे निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात कोणताही खंड पडणार नसून, ते टप्प्याटप्प्याने विषय उत्तीर्ण करून पदवी मिळवू शकणार आहेत. विद्यापीठ परिषदेत साधारणतः ७० सदस्यांच्या उपस्थितीत हा निर्णय झाला आहे. अमरावतीसह, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यांतील कला, वाणिज्य, विज्ञान, फार्मसी, अभियांत्रिकी आदी शाखांसाठीच्या विद्यार्थ्यांना 'कॅरिऑन' लागू झाला आहे. ही पद्धत अन्य विद्यापीठात लागू होणार का? हे पुढील काळात पाहावे लागणार आहे.