'आपले सरकार' पाच दिवस बंद, विद्यार्थ्यांचे होणार हाल..

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाने (Maharashtra Information Technology Corporation) विकसित केलेल्या आपले सरकार पोर्टलवरून राज्य शासनाच्या विविध विभागांच्या सेवा  प्रदान केल्या जातात. मात्र, आता हेच आपले सरकार पोर्टल १० एप्रिल ते १४ एप्रिल असे पाच दिवस बंद राहणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 

'आपले सरकार' पाच दिवस बंद, विद्यार्थ्यांचे होणार हाल..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक व नोकरी विषयक कागदपत्र (Educational and employment documents) काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वापरले जाणारे 'आपले सरकार पोर्टल' (Aaple Sarkar Portal 5 days Closed) तब्बल पाच दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यी आणि पालकांना अत्यावश्यक असलेले कागदपत्रांसाठी १४ तारखेनंतरच अर्ज दाखल करता येणार आहे. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाने (Maharashtra Information Technology Corporation) विकसित केलेल्या आपले सरकार पोर्टलवरून राज्य शासनाच्या विविध विभागांच्या सेवा  प्रदान केल्या जातात. मात्र, आता हेच आपले सरकार पोर्टल १० एप्रिल ते १४ एप्रिल असे पाच दिवस बंद राहणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 

'आपले सरकार' हे महाराष्ट्र शासनाचे एक वेब पोर्टल आहे, जे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ नुसार तयार करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे, नागरिक विविध सरकारी सेवांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि त्यांची माहिती मिळवू शकतात. नागरिकांना सरकारी सेवा सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देणे, पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवणे हा या मागचा उद्देश आहे. मात्र, आता हे पोर्टल पुढील पाच दिवस बंद राहणार असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे हाल होणार आहेत. काही शैक्षणिक व नोकरी विषयक कागदपत्रे काढण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार नाही. 

या पोर्टलची नियमित देखभाल आणि तांत्रिक अद्यतनासाठी पुढचे पाच ते हे पोर्टल बंद करण्यात येणार आहे. या काळात कार्यालयीन कामकाजाचा फक्त एक दिवस वगळता उर्वरित सर्व दिवस सार्वजनिक सुट्टीचे आहेत. राज्यातील सर्वसामान्य नागरिक, ग्रामीण आणि शहरी भागातील 'आपले सरकार' केंद्र चालक, 'सेतू' केंद्र चालक, संबंधित ग्रामपंचायती आणि शासकीय कर्मचारी यांनी या पूर्वसूचनेची नोंद घ्यावी. या कालावधीत 'आपले सरकार' सेवा पोर्टलमार्फत दिली जाणारी कोणतीही सेवा उपलब्ध असणार नाही असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.