जि. प. शाळेत १२० विद्यार्थ्यांना बिस्कीटातून विषबाधा..
विद्यार्थ्यांना जवळच्या पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या या सर्व विद्यार्थ्यांची परिस्थिती स्थिर असून घाबरण्याचे काही कारण नसल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. विषबाधीत झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा १२० च्या पुढे गेला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhajinagar News) पैठण तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद (Kekat Jalgaon Z.P. School) शाळेती तब्बल शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा (School nutrition poisoning of students) झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना जवळच्या पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी (on students Treatment started in the hospital) दाखल करण्यात आले आहे. सध्या या सर्व विद्यार्थ्यांची परिस्थिती स्थिर असून घाबरण्याचे काही कारण नसल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. विषबाधीत झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा १२० च्या पुढे गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गात एकूण २९६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नेहमीप्रमाणे विद्यार्थी शाळेत आले मध्यंतरी विद्यार्थ्यांना खिचडी व पौष्टीक आहाराच वाटप केले जाते. परंतु, शनिवार असल्याने विद्यार्थ्यांना बिस्कीट देण्यात आहे. वाटप करण्यात आलेले बिस्कीट खाल्ल्यानंतर जपळपास अर्ध्या तासाने काही विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ, चक्कर येणे, ताप आल्याचे निदर्शनात आले. त्यानंतर शिक्षक आणि पालकांनी मिळून त्रास होत असलेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.
शालेय पोषण आहारातून याअगोदर देखील अनेक वेळा विषबाधा झाली आहे. मात्र, शालेय शिक्षण विभाग याकडे कानाडोळा करताना दिसून येत आहे. शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या खिचडीमध्ये अळ्या, उंदराच्या लेंड्या यासारख्या घटना परिसरात घडल्या आहे. असे वारंवार घडून देखील शिक्षक आणि शालेय पोषण आहार समिती यांच्याकडे संतप्त बालकांनी संताप व्यक्त केला आहे.