विद्यार्थिनीचा जीव घेतलेल्या 'त्या' शाळेची अखेर मान्यताच रद्द, शासन निर्णय जारी
शाळेत येण्यास उशीर झाल्याने एका विद्यार्थिनीला उठाबशा काढण्याची शिक्षेच्या दरम्यान या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीनंतर श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेच्या हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही शाळांची सन २०२५- २६ अखेर या शाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे. शासनाने याबाबत परिपत्रक जारी केलं आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
वसईतील एका शाळेला विद्यार्थिनीला शिक्षा करण्याच प्रकरण (The case of punishing a student) चांगलच भोवलं आहे. शाळेत येण्यास उशीर झाल्याने एका विद्यार्थिनीला उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली होती. त्यादरम्यान या विद्यार्थिनीचा मृत्यू (Student's death) झाला. ही विद्यार्थिनी वसईतील श्री हनुमंत विद्यामंदिर या शाळेत (Shri Hanumant Vidyamandir School Vasai) इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होती. मात्र, आता हे प्रकरण शाळेच्या चांगलच अंगलट आलं आहे. या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीनंतर श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेच्या हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही शाळांची सन २०२५- २६ अखेर या शाळेची मान्यता रद्द (School de-recognition) करण्यात आली आहे. शासनाने याबाबत परिपत्रक जारी केलं आहे.
हेही वाचा - 'एमपीएससी'चा पुन्हा गोंधळ! MPSC आणि NEET परीक्षा एकाच दिवशी
शाळेतील एका शिक्षिकेने उशीरा आल्याच्या कारणास्तव या विद्यार्थिनीसह अन्य काही विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती. त्यामुळे एका सहावीत शिक्षणाऱ्या विद्यार्थ्यांनीचा मृत्यू झाला. या घडलेल्या घटनेनंतर सर्वच स्तरातून शाळेच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. याशिवाय या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करण्यात आली. त्यानंतर श्री. हनुमंत विदयामंदिर शाळा, कुवरापाडा, सातिवली (इंग्रजी माध्यम) व (हिंदी माध्यम) या दोन्ही शाळांची मान्यता शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अखेर रद्द करण्यात येत असल्याचे शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी या शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन अन्य शाळेत करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मान्यता रद्द करण्याची 'ही' आहेत प्रमुख कारणे
विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक शिक्षा करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला असताना देखील शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा दिली. शाळेत शिकविण्यासाठी असलेल्या शिक्षकांची शैक्षणिक अर्हता व व्यावसायिक पात्रता निकषाप्रमाणे दिसून आल्या नाहीत. विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा व विद्यार्थी सुरक्षेबाबत उपाययोजना केली नाही त्यामुळे शाळेला नोटीस दिली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम-२००९ नुसार या दोन्ही शाळांनी "नमुना-२" प्रमाणपत्र घेतलेले नाही. शाळा बांधकामाला परवानगी घेतलेली नाही. इयत्ता ९ वी आणि १० वी चे वर्ग मान्यता नसताना अनधिकृत पणे भरविले जात होते. शाळांमध्ये सखी-सावित्री समिती, माता पालक संघ अशा आवश्यक समित्या स्थापन करण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे सर्वच गोष्टींमध्ये ही शाळा दोषी आढळल्याने शाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे.