मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; 'या' सरकारचा मोठा निर्णय
ऑपरेशन सिंदूरमुळे राज्यभरातील विद्यार्थी लहानपणापासूनच देशप्रेमाचे धडे गिरवणार आहेत. या विद्यार्थ्यांना देशभक्तीने भरलेल्या इतिहासाची ओळख करून दिली जाणार आहे. या उपक्रमामुळे मुलांचा अशा संशोधनाकडे कल वाढेल ज्यामुळे त्यांची राष्ट्रीय हितांबद्दलची ओढ वाढणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Chief Minister Pushkar Singh Dhami) यांच्या नेतृत्वाखालील उत्तराखंड सरकारने (Uttarakhand government) राज्यातील मदरशांच्या अभ्यासक्रमात ऑपरेशन सिंदूरवरील (Operation Sindoor) एक अध्याय (new chapter) समाविष्ट करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. उत्तराखंडमधील ४५१ नोंदणीकृत मदरशांमध्ये (registered madrasas) ५० हजाराहून अधिक विद्यार्थी नोंदणीकृत आहेत, जे आता ऑपरेशन सिंदूरबद्दलचे धडे शिकणार आहेत.
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, ज्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला करण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले होते.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारतीय सैन्याने जम्मू आणि काश्मीरमधील पीर पंजाल रेंजच्या दक्षिणेकडील भागातून नऊ पैकी सात हल्ले केले, ज्यामध्ये पाकिस्तानमधील सीमेपलीकडे असलेल्या दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले आणि त्यांचा नाश केला, असे वृत्त पीटीआयने लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारताच्या कारवाईनंतर, पाकिस्तानने ८, ९ आणि १० मे रोजी भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. चार दिवसांच्या चकमकीनंतर १० मे रोजी दोन्ही बाजूंनी युद्ध थांबवण्याबाबत एक करार झाला.
"भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएमओ) यांच्यात सुमारे एक आठवड्यापूर्वी युद्ध थांबवण्याबाबत झालेल्या सामंजस्याची कोणतीही मुदत संपलेली नाही," असे भारतीय लष्कराने सांगितले आहे.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरमुळे राज्यभरातील विद्यार्थी लहानपणापासूनच देशप्रेमाचे धडे गिरवणार आहेत. या विद्यार्थ्यांना देशभक्तीने भरलेल्या इतिहासाची ओळख करून दिली जाणार आहे. या उपक्रमामुळे मुलांचा अशा संशोधनाकडे कल वाढेल ज्यामुळे त्यांची राष्ट्रीय हितांबद्दलची ओढ वाढणार आहे.
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात शालेय स्तरापासूनच मुलांमध्ये अशी बीजे रोवण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. याचबरोबर केंद्र सरकार चांद्रयानाचाही धडा या अभ्यासक्रमात जोडणार आहे. चांद्रयानासोबतच ऑपरेशन सिंदूर देखील आता लहान मुलांच्या हृदयात आहे. त्यांच्या तोंडी ब्रम्होस, आकाश मिसाईलचे नाव आहे. भारताने पाकिस्तानवर कसा हल्ला केला, आपल्या शूर जवानांनी काय काय पराक्रम केले हे त्यांना आता माहिती होणे गरजेचे आहे. याचा पुढील पिढी घडविण्यासाठीही फायदा होणार आहे.