महाराष्ट्रात 'या' तीन ठिकाणी एआय कौशल्य केंद्र उभारण्यात येणार
याद्वारे प्रशासनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी हा महत्त्वपूर्ण करार झाला. या करारानुसार मुंबईत भौगोलिक विश्लेषण करण्यासाठी एआय केंद्रीची स्थापना करण्यात येणार आहे तर पुण्यात न्यायवैद्यकीय विज्ञानाच्या पायाभूत सुविधांसाठी आणि नागपूरात प्रगत एआय संशोधन व MARVEL अंमलबजावणी तंत्रज्ञानासाठी या केंद्राची स्थापना केली जाणार आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रात मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन ठिकाणी कृत्रिम (Mumbai, Nagpur, Pune AI Center) बुद्धिमत्ता (AI) कौशल्य व उत्कृष्टता केंद्र (Center of Skills and Excellence) उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी (इंडिया) यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार (Maharashtra Government and IBM Technology Agreement) झाला आहे. याद्वारे प्रशासनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी हा महत्त्वपूर्ण करार झाला. या करारानुसार मुंबईत भौगोलिक विश्लेषण करण्यासाठी एआय केंद्रीची स्थापना करण्यात येणार आहे तर पुण्यात न्यायवैद्यकीय विज्ञानाच्या पायाभूत सुविधांसाठी आणि नागपूरात प्रगत एआय संशोधन व MARVEL अंमलबजावणी तंत्रज्ञानासाठी या केंद्राची स्थापना केली जाणार आहे.
या भागीदारीचा उद्देश सार्वजनिक सेवा वितरण अधिक परिणामकारक, वेगवान व नागरिक-केंद्रित बनवणे हा असून, AI, हायब्रिड क्लाऊड, डेटा अॅनालिटिक्स, सायबर सुरक्षा आणि ऑटोमेशनसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर यामध्ये केला जाणार आहे. या कराराद्वारे व्हर्च्युअल सहाय्यक आणि एजेन्टिक AI च्या साहाय्याने शासकीय सेवा अधिक सुलभ आणि वैयक्तिक करण्यात येणार आहे. AI मॉडेल्सवरील मालकी हक्क महाराष्ट्र शासनाकडे असणार असून, तंत्रज्ञानावर शासनाचे पूर्ण नियंत्रण राहणार.
जनरेटिव्ह AI चा वापर करून प्रशासकीय प्रक्रिया अधिक आधुनिक, अंदाजाधारित व पारदर्शक बनवली जाणार असून हायब्रिड क्लाऊड, ओळख व्यवस्थापन आणि सुरक्षित नागरिक प्रवेश प्रणाली यांवर विशेष भर दिला जाणार आहे. IBM च्या प्रशिक्षण प्लॅटफॉर्मचा उपयोग करून सरकारी कर्मचारी व विद्यार्थ्यांना AI, सायबर सुरक्षा व क्लाऊड तंत्रज्ञान यामध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर MSME आणि उद्योग क्षेत्राला AI व ऑटोमेशन स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, ज्यामुळे उत्पादनक्षमता व स्पर्धात्मकता वाढेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे. वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, आयबीएमचे व्यवस्थापकीय संचालक संदीप पटेल व इतर मान्यवर उपस्थित होते.